श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय १५ ते अध्याय २१ फळश्रुती
श्री गजानन विजय ग्रंथाचा कोणता अध्याय कधी वाचावा जाणून घ्या
अध्याय १५-आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःची ओळख आणि भरपूर प्रसिद्धीसाठी, काम- क्रोध मत्सर लोभ पासून दूर राहण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी, प्रमोशन मिळण्यासाठी, पगार वाढीसाठी, असहनशील व्यक्तींनी सहनशीलता अंगी येण्यासाठी अध्याय १५ वाचावा.
अध्याय १६-खूप मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी, अती तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असल्यास अध्याय १६ वाचावा.
अध्याय १७ -खोट्या/चुकीच्या आरोपातून मुक्तता, दुसऱ्यांकडून मत्सर आणि तत्सम संकटांपासून मुक्ती होण्यासाठी अध्याय १७ वाचावा.
अध्याय १८ -खोट्या आरोपातून मुक्तता होण्यासाठी, तीर्थ अंगारा घेऊन ह्या अध्यायाचे वाचन केल्यास शारीरिक व्याधी दूर होतील, इष्ट देवतेचे दर्शन होईल अध्याय १८ वाचावा.
अध्याय १९ -विवाह योग्य मुलामुलींना मनायोग्य जीवनसाथी मिळेल, स्वकष्ट व स्वसामर्थ्यावर विश्वास असणाऱ्या भक्तांना काही कारणाने प्रमोशन मिळत नसेल प्रगती होत नसेल तर त्यांची प्रगती होईल अध्याय १९ वाचावा.
अध्याय २० -विवाहित जीवनात सफलता मिळेल, उद्योग धंद्यात झालेले नुकसान भरून निघेल, प्रकृती स्वास्थ्य लाभेल अध्याय २० वाचावा.
अध्याय २१ -मनःशांती, आरोग्य, सुखसमृद्धी आणि मानसिक समाधानासाठी वाचा आणि प्रचीती घेण्यासाठी अध्याय २१ वाचावा.