शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019 (13:15 IST)

चार वर्षांत देशात 1500 बालविवाह

2013 ते 2017 या कालावधीत देशभरात बालविवाहाची 1500हून अधिक प्रकरणं समोर आली असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत दिली.
 
बालविवाहाची सर्वाधिक 395 इतकी प्रकरणं 2017 मध्ये समोर आली. सन 2016मध्ये 326, सन 2015मध्ये 293 , 2014 मध्ये 280 आणि 2013 मध्ये 222 बालविवाह झाले, असं इराणी यांनी सांगितलं.
 
2017मध्ये सर्वाधिक बालविवाह कर्नाटकात झाले. त्यााधीच्या 4 वर्षांमध्ये त्याबाबत तमिळनाडू आघाडीवर होते, असंही त्यांनी म्हटलं.