1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 13 मे 2019 (10:17 IST)

अतिरेकी मारण्यासाठी निवडणूक आयोगाला विचारायचं का?- नरेंद्र मोदी

Election Commission
दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आता निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची की काय, असा उपरोधिक सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे.
 
काश्मीरमधील शोपियान येथे रविवारी सकाळी लष्कराशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. त्या अनुषंगाने उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले, "देशाच्या काही भागांत लोकसभा निवडणुकांसाठी सहाव्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना दहशतवाद्यांना आमच्या सरकारने मारले म्हणून काही लोक चिंताग्रस्त आहेत. जेव्हा सशस्त्र दहशतवादी हल्ला करतात तेव्हा त्यांना मारण्याच्या परवानगीसाठी लष्करी जवानांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे जायला हवं की काय?"
 
देशात निवडणुका सुरू असताना सुरक्षा जवान दहशतवाद्यांवर गोळीबार करतात, अशी धक्कादायक विधानं विरोधक कसे करू शकतात, असा सवालही त्यांनी विचारला.