रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (11:52 IST)

गुरू नानक यांनी जेव्हा जानवं घालण्यास नकार दिला होता...

आज शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांची जयंती आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला.
 
नानक यांनी शीख धर्मात हिंदू आणि इस्लाम दोन्ही धर्माच्या गुणांचा समावेश केला. पण शीख धर्म केवळ हिंदू आणि इस्लामचे संकलन नाही.
 
गुरू नानक हे एक मूलभूत आध्यात्मिक विचारवंत होते. त्यांनी आपल्या कल्पना एका विशिष्ट काव्यशैलीत मांडल्या. हीच शैली धर्मग्रंथ 'गुरुग्रंथ साहेब'चीही आहे.
 
शीख परंपरेत त्यांच्याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे. गुरू नानक यांची शिकवण आपल्यापर्यंत जयंतीच्या माध्यमातून पोहचली आहे.
 
बालक नानक यांचा जन्म 1469 मध्ये लाहोरपासून 64 कि.मी. अंतरावर झाला.
 
नानक यांच्या जन्मानंतरची सुरुवातीची काही वर्ष विविध अंगांनी खास आहेत, असे शीख परंपरेनुसार सांगितले जाते. ईश्वर नानक यांना काहीतरी वेगळे करण्यासाठी प्रेरित केले गेले होते असेही सांगितले जाते.
 
नानक यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता. त्यांनी लहानपणीच इस्लाम आणि हिंदू धर्माचा व्यापक पद्धतीने अभ्यास सुरू केला. परिणामी, नानक यांच्याकडे लहानपणीच काव्यशैली आणि तत्त्वज्ञानाची अद्भुत क्षमता होती.
 
शीख परंपरेत त्यांच्याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे. गुरू नानक यांची शिकवण आपल्यापर्यंत जयंतीच्या माध्यमातून पोहचली आहे.
 
बालक नानक यांचा जन्म 1469 मध्ये लाहोरपासून 64 कि.मी. अंतरावर झाला.
 
नानक यांच्या जन्मानंतरची सुरुवातीची काही वर्ष विविध अंगांनी खास आहेत, असे शीख परंपरेनुसार सांगितले जाते. ईश्वर नानक यांना काहीतरी वेगळे करण्यासाठी प्रेरित केले गेले होते असेही सांगितले जाते.
 
नानक यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता. त्यांनी लहानपणीच इस्लाम आणि हिंदू धर्माचा व्यापक पद्धतीने अभ्यास सुरू केला. परिणामी, नानक यांच्याकडे लहानपणीच काव्यशैली आणि तत्त्वज्ञानाची अद्भुत क्षमता होती.
 
याच ठिकाणी त्यांनी मोठ्या संख्यने अनुयायांना शिकवण देवून आकर्षित केले. इश्वर एक आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या देवापर्यंत थेट पोहचू शकते हा गुरू नानक यांचा प्रमुख संदेश होता. यासाठी रूढी, पुजारी किंवा मौलवी यांची आवश्यकता नाही असे ते सांगायचे.
 
गुरू नानक यांनी प्रचंड अभ्यास केला आणि सुशिक्षितांशी त्यांचा वादही झाला.
 
गुरू नानक यांनी जाती व्यवस्था संपुष्टात आणून क्रांतिकारी सुधारणा केली. प्रत्येक व्यक्ती समान आहे मग ती कोणत्याही जाती,धर्माची किंवा लिंगची असो ही बाब त्यांनी प्रामुख्याने या स्थापित केली.
 
(हा लेख मुळत: 4 नोव्हेंबर 2017 रोजी गुरू नानक जयंतीदिवशी प्रकाशित झाला होता.)