मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 4 मे 2021 (14:55 IST)

बंगालमधील हिंसाचाराबद्दल कंगना रनौत दुखी, रडत रडत राष्ट्रपती राजवटची मागणी केली

instagram
बंगाल निवडणुकीत भाजपाचा पराभव आणि तृणमूल काँग्रेस (TMC) च्या विजयानंतर कंगना रनौत (Kangana  Ranaut) वादग्रस्त विधाने करत आहेत. बंगालची काश्मीरशी तुलना करून ममता बॅनर्जी यांना ‘खून की प्यासी’ भासविल्यानंतर आता ती भारत सरकारला राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा सल्ला देत आहे. कंगनाचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले आहे, त्यामुळे आता कंगनाने इन्स्टाग्राम अकाउंटवर रडत आपली व्यथा व्यक्त केली आहे.
 
कंगना रनौतने तिचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. कंगनाने भारत सरकारला मेसेज दिला आहे. या व्हिडिओमध्ये कंगना रनौत रडताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये कंगना बोलत आहे की, ‘मित्रांनो, आपण सर्वजण पाहत आहोत की सतत बंगालमधून त्रासदायक बातम्या येत आहेत. लोकांची हत्या केली जात आहे, सामूहिक बलात्कार केला जात आहे. घरे जाळली जात आहेत कोणतेही उदारमतवादी काही बोलत नाहीत. बीबीसी वर्ल्ड, टेलीग्राफ, टाइम कोणतेही आंतरराष्ट्रीय पेपर त्यावर कवर करत नाही आहे.  
 
ती पुढे म्हणाली, 'हे भरताविरुद्ध षडयंत्र आहे का हे मला समजत नाही. त्यांना आमच्याबरोबर काय करायचे आहे? हिंदूंचे रक्त इतके स्वस्त आहे का? देशद्रोह्यांना तुम्ही इतके घाबरत का आहात ... देशद्रोही देश चालवतील का? मला माहीत आहे की आंतरराष्ट्रीय दबाव आहे, आम्ही वाईटरीत्या अडकलो आहोत. परंतु या क्षणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज आहे ... जवाहरलाल नेहरूंनी 12 वेळा राष्ट्रपती राजवट लागू केले होते, तेव्हा इंदिरा गांधींनी 50 वेळा मनमोहनसिंग यांनी 10-12 वेळा ठोठावले होते ... तर आपल्याला कशाची भीती वाटते .. देशद्रोही हे देश चालवतील का?  .... निर्दोष लोक मारले जातील आणि आम्ही निषेध करू, मी माझ्या सरकारला सांगू इच्छित आहे की, लवकरात लवकर कठोर पावले उचलण्यास '.
 
अशाच पोस्टिंगमुळे कंगना रनौत हिचे ट्विटर अकाउंटही निलंबित करण्यात आले आहे. तिच्या समर्थनार्थ कंगनाचे चाहते बाहेर आले आहेत, तर तिथे अभिनेत्री ट्रोलही होत आहेत.