शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

विड्याच्या पानांमुळे तुमच्या अडचणी दूर होण्यास मदत मिळते

पान खाण्याची परंपरा आमच्या देशात बरीच जुनी आहे. पाहुण्यांना पान खाऊ घालून विद्ध करणे, शुभ कार्यात पान खाणे आणि पूजेत पान अर्पित करण्याचे प्रावधान आहे. पानाचे काही उपाय तुमच्या जीवनातील समस्या दूर करण्यास मदत करू शकतात.
 
हिंदू धर्मात पानाचे फार महत्त्व आहे. कुठल्याही कामासाठी विड्याच्या पानाचे आपले महत्त्व आहे. पूजेत पानाचे वापर देवांचा अंघोळीसाठी केले जाते आणि पानाने त्यांच्यावर जल अर्पित करण्यात येत. एखाद्या जागेच्या शुद्धीकरणासाठी विड्याच्या पानाचा वापर केला जातो. त्याशिवाय तंत्र साधनेत देखील पानाचे महत्त्व आहे. याने तुमची मनोकामना पूर्ण होते. तर जाणून घेऊ पानाचे असे काही उपायांबद्दल :
 
महादेवाला पान अर्पित केल्याने व्यक्तीची सर्व मनोकामना पूर्ण होते. महादेवाला पान अर्पित करताना हे लक्षात ठेवायला पाहिजे की पूजेत वापर होणारा पान तुटलेले किंवा वाळलेले नसावे. ते ताजे आणि चमकदार असायला पाहिजे. नाहीतर पूजा पूर्ण होत नाही.
 
जर व्यवसायात त्रास असेल तर पानाचे दान केल्याने लाभ मिळतो. विड्याचे पान नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवणारा असतो.   
 
पानामुळे वाईट दृष्टेच देखील उपाय केला जाता. जर कोणाला वाईट दृष्ट लागली असेल, तर त्या व्यक्तीला विड्याच्या पानात गुलाबाच्या सात पाकळ्या खाऊ घातल्याने वाईट दृष्टेच प्रभाव कमी होतो. या पानात फक्त गुलकंद, खोबर्‍याचा बुरा, कत्था, सौंफ आणि सुमन कतरी घातलेली असते.
 
व्यापारात लाभ मिळवण्यासाठी शनिवारी सकाळी पाच पिंपळाचे पान आणि 8 विड्याचे साबूत दांडीवाले पान घेऊन त्यांना दोर्‍यात घालून दुकानाच्या पूर्व दिशेत बांधून द्यावे. हे उपाय कमीत कमी पाच शनिवारी केले पाहिजे. जुन्या पानांना एखाद्या नदीत प्रवाहित केले पाहिजे.   
 
जर कामात अडचण येत असेल तर रविवारी एक विड्याचे पान घराबाहेर निघताना घेऊन निघावे, तर तुमचे अडकलेले काम पूर्ण होतील आणि घरात बरकत कायम राहते.