बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (11:17 IST)

कर्णधार झाल्यानंतर विराट कोहली मध्ये काय बदल झाला,हे युवराज सिंग यांनी सांगितले

भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने सध्याचा कर्णधार आणि जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहलीचे कौतुक केले आहे.विराटच्या नेतृत्वात युवराज सिंगने टीम इंडियाकडून काही मर्यादित षटकांचे सामने खेळले आहेत.कर्णधार झाल्यानंतर विराटमध्ये कोणत्या प्रकारचे बदल घडले हे युवीने सांगितले. 
 
युवीने विराटचे कौतुक केले आणि सांगितले की निवृत्त झाल्यानंतर लोक महान  बनतात आणि विराट असा क्रिकेटपटू आहे जो वयाच्या 30 व्या वर्षी महान  झाला. युवी म्हणाले की विराट आता बरेच टप्पे साध्य करेल कारण त्याच्याकडे खूप वेळ आहे. युवराज सिंगने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जून 2017 मध्ये खेळला होता, युवीने हा सामना विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळला होता. 
 
एका मुलाखतीत युवी म्हणाला की, 'तो बऱ्याच धावा करत होता आणि त्यानंतर त्याला कर्णधार बनविण्यात आले. कधीकधी असे घडते की कर्णधार झाल्यानंतर आपल्यावर थोडा दबाब येतो, परंतु जेव्हा तो कर्णधार झाला तेव्हा त्याची कन्सिस्टन्सी आणखी चांगली झाली.वयाच्या 30 व्या वर्षी त्याने बरेच काही मिळवले आहे.निवृत्त झाल्यावर लोक महान बनतात, परंतु ते आधीच महान बनले आहेत. त्याला एक क्रिकेटपटू म्हणून वाढताना पाहण्याचा एक अद्भुत अनुभव आहे. मला आशा आहे की अद्याप बराच वेळ असल्यामुळे तो उच्च शिखरावर पोहोचणार आहे.
 
युवराज सिंगने विराटच्या फिटनेस आणि शिस्तीचेही कौतुक केले आहे. तो म्हणाला, 'मी त्याला माझ्यासमोर वाढताना आणि तयार होताना बघितले आहे.. तो कदाचित आतापर्यंतचा सर्वात कष्टकरी व्यक्ती आहे. त्याच्या खाण्यापिण्याची खूप शिस्त आहे. तो त्याच्या प्रशिक्षणाबद्दल खूप शिस्तबद्ध आहे .जेव्हा तो धावा करत होता तेव्हा आपण अनुभवता की जगातील सर्वोत्तम खेळाडू बनू इच्छित असलेल्या अशा लोकांपैकी तो एक आहे. त्याचे व्यक्तिमत्त्व तसेच आहे आणि स्वैग देखील तसाच आहे.