पंचतंत्र कहाणी : चिमणी आणि हत्तीची गोष्ट  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  एका घनदाट जंगलात एक चिमणी एका झाडावर आपल्या पतीसह आनंदात राहत होती. ती आपल्या घरट्यातील अंड्यातून पिल्ले बाहेर येण्याची आतुरतेने वाट पाहत होती.
				  													
						
																							
									  
	 
	एकदा चिमणी आपल्या अंड्यांसोबत झोपली होती.तसेच तिचा पती चिमणा हा अन्नाचा शोधात बाहेर गेला होता. तेव्हा तिथे एक रागिष्ट हत्ती आला व जवळपासच्या झाडांना तुडवत उखडून फेकत नुकसान करीत आला. तसेच तो चिमणीच्या झाडाजवळ देखील पोहचला. व त्याने झाड पाडण्यासाठी झाडाला जोरजोर्यात हलवायला सुरवात केली. झाड खूप मजबूत होते म्हणून हत्ती ते झाड पाडू शकला नाही. तसेच तिथून निघून गेला. पण हत्तीने ते झाड हलवल्यामुळे चिमणीचे घरटे खाली कोसळले होते. व घरट्यातील सर्व अंडी फुटली होती. 
				  				  
	 
	हे पाहून चिमणी दुखी झाली आणि जोरजोर्यात रडू लागली. तसेच थोड्यावेळाने चिमणा परत आला. व चिमणीला रडतांना पाहून तो देखील दुःखी झाला. त्यांनी हत्तीला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	चिमणा एक दिवस त्याच्या एका मित्राला भेटला;जो लाकूडतोड्या होता.चिमण्याने त्याला सर्व प्रकार सांगितला. तसेच चिमण्याला हत्तीपासून सूड घेण्यासाठी लाकूडतोड्याची मदत हवी होती. लाकूडतोड्याचे आणखी दोन मित्र होते; एक मधमाशी आणि बेडूक. दोघांनी मिळून हत्तीचा बदला घेण्याची योजना आखली.
				  																								
											
									  
	  
	तसेच योजने अनुसार मधमाशीने काम सुरु केले.ती हत्तीच्या कानात जाऊन गुणगुण करायला लागली.  हत्तीने संगीताचा आस्वाद घेतला आणि हत्ती संगीतात तल्लीन झाल्यावर लाकूडतोड्याने पुढच्या योजनेवर काम करायला सुरवात केली. त्याने हत्तीचे दोन्ही डोळे फाडून टाकले. हत्ती वेदनेने ओरडू लागला. त्यानंतर, बेडूक त्याच्या गटासह एका दलदलीत गेला आणि सर्वजण मिळून आवाज करू लागले. बेडकांचा आवाज ऐकून हत्तीला वाटले की जवळच तलाव आहे. तो त्या आवाजाच्या दिशेने गेला आणि दलदलीत अडकला. अशा प्रकारे हत्ती हळूहळू दलदलीत अडकला आणि मरण पावला.
				  																	
									  
	   
	तात्पर्य :  कोणालाही कमकुवत लेखू नये. एकीचे बळ मोठ्या ताकदवर शत्रूवर देखील मात करू शकते.
				  																	
									  Edited By- Dhanashri Naik