शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (08:10 IST)

हे रिलेशनशिप टिप्स आपल्या नात्यातील दुरावा दूर करतील

आजच्या आयुष्यात आवश्यकता आहे नात्याला सांभाळून ठेवण्याची. काही नाते असे असतात जे तुटायची भीती नेहमी असते.  काही नाते तणावाचे कारण बनतात आणि आयुष्यात तणाव निर्माण करतात. असं होऊ नये. नाते कोणते ही असो तुटू नये या साठी काही टिप्स सांगत आहोत ह्याचे अनुसरणं केल्याने नातं तुटणार नाही त्या मध्ये दुरावा येणार नाही.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
 * एकत्र राहा :कधी कधी असे होते की आपला जोडीदार आपल्यापेक्षा काही वेगळे विचार करत असतील किंवा चुकीचे वागत असेल तर त्याला एकटे ठेवू नका आणि त्याला समजवत  राहा. त्याला नेहमी साथ द्या आणि एकत्र राहा.
 
* वेळ द्या- जीवनात धाव पळ आहेच बऱ्याच वेळा ऑफिसच्या कामात किंवा इतर कामात इतके व्यस्त होतो की आपल्या जोडीदाराला वेळच देऊ शकत नाही. असं करू नका वेळ काढून आपल्या जोडीदाराला वेळ द्या.असं केल्याने नातं दृढ होते.
 
* घाई करू नका- आयुष्यात प्रत्येक गोष्टीची घाई चांगली नाही अति घाई संकटात नेई असे म्हणतात. प्रत्येक कामात घाई करणे चांगले नाही मग ते जोडीदाराची निवड करण्यासंबंधी असो. बऱ्याच वेळ घाईने घेतला जाणारा निर्णय भविष्यासाठी चुकीचा असू शकतो.
 
* चूक स्वीकारा- चूक करणे आणि त्याच्या वर पांघरून घालणे सोपे आहे किंवा चूक करून दुसऱ्याला दोष देणे सोपे आहे पण चुकीला मान्य करणे कठीण असते. जर आपल्याला नाते टिकवायचे  असेल तर आपण केलेली चूक मान्य करायला शिका आणि प्रयत्न करा की भविष्यात तशी चूक पुन्हा घडू नये.
 
* बनावटी पणा करू नका-  नात्यात देखावा किंवा बनावटी पणा करू नये. आपण आपल्या जोडीदाराला खूश ठेवू इच्छिता तर त्यांच्या खुशीसाठी स्वतःला बदलण्याचा देखावा करू नका. केलेला देखावा जास्त दिवस टिकून राहत नाही आणि नात्यात जडपणा जाणवतो. या मुळे नाते दीर्घकाळ टिकत नाही.
 
हे उपाय अनुसरणं करा आणि नात्याला दृढ करा.