शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :श्रीनगर , शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (11:20 IST)

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या तीन चकमकीत 4 दहशतवादी ठार

4 terrorists killed in three encounters with security forces in Jammu and Kashmir
भारतीय सुरक्षा दलांनी काल रात्री शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान काश्मीरमध्ये 3 चकमकीत 4 दहशतवादी मारले गेले आहेत. पुलवामा येथे दोन, गांदरबल आणि हंदवाडा येथे प्रत्येकी एक दहशतवादी मारला गेला आहे. जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये शनिवारी पहाटे चकमक सुरू झाली. यापूर्वी काल म्हणजेच शुक्रवारी पुलवामामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पुलवामा चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्याचवेळी चकमक सुरू असून काही दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. हंदवाडा येथेही चकमक सुरू आहे. हंदवाडा आणि गांदरबलमध्ये प्रत्येकी एक दहशतवादी मारला गेल्याचा दावा केला जात आहे. 
 
या महिन्यात दहशतवाद्यांनी आतापर्यंत तीन पंचायत प्रतिनिधींची हत्या केली आहे. यापूर्वी ९ मार्च रोजी श्रीनगरच्या खोन्मुहमध्ये दहशतवाद्यांनी घरात घुसून पीडीपीचे सरपंच समीर अहमद भट यांची हत्या केली होती. 2 मार्च रोजी कुलगाम जिल्ह्यातील कुलपोरा सरांद्रो भागात स्वतंत्र पंच मोहम्मद याकूब दार यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याच्यावर घराबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या. भाजपचे काश्मीरचे मीडिया प्रभारी मंजूर भट यांनी या घटनेचा निषेध केला असून अशा हल्ल्यांना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी असे म्हटले आहे.
 
आयजी काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले की, दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले सरपंच शब्बीर अहमद मीर यांना श्रीनगरमधील सुरक्षित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांना न कळवता ते हॉटेलमधून निघून घरी पोहोचले. त्यांनी आवाहन केले आहे की संरक्षित व्यक्तींनी SOP चे पालन करावे. पोलिसांना माहिती दिल्याशिवाय कुठेही जाऊ नका. 
 
दरम्यान, लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी कुलगाममधील सरपंच शब्बीर अहमद मीर यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि सांगितले की, आमचे पोलीस आणि सुरक्षा दल दहशतवादी परिसंस्था नष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहेत. कुटुंबाला माझ्या मनापासून संवेदना. जम्मू-काश्मीर प्रशासन या दु:खाच्या काळात कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे.