शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 एप्रिल 2017 (20:39 IST)

भगवा दहशतवाद हा काँग्रेसने रचलेला कट : साध्वी प्रज्ञा सिंह

भगवा दहशतवाद हा काँग्रेसने रचलेला कट होता, असा आरोप करत या कटामध्ये मी बळी झाल्याचे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी  म्हटले आहे. आता तब्बल नऊ वर्षे आपल्यावर अन्याय झाल्याचेही त्यांनी सांगितले. 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह  जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्या आहेत.  तुरुगांतून बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर टीका केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या नऊ वर्षांच्या अन्यायातून मुक्त झाले आहे, आता स्वतःवर योग्य उपचार करुन घेणार आहे. यावेळी बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह यांनी हायकोर्टाचे आभार मानले तसेच गेल्या 9 वर्षांत दहशतवादाला बळी पडलेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली.