अखिलेश यादव यांचे मोदी यांना आव्हान
लखनौ- दादरी प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले असून या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी एका लेखी निवेदनाद्वारे केल्याचे उत्तर प्रदेश सरकारच प्रवक्त्याने सांगितले आहे.
क्रांतीविरुध्द बोलणार्यांनी गोमांसाच्या निर्यातीवर कडक निर्बध घालावेत आणि गोहत्या रोखावी, अशी मागणी यादव यांनी मोदी यांच्याकडे केली आहे. मोदी यांनी देशाची धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्यासाठी आपले धार्मिक व जातीचे धोरण बदलावे, असे यादव यांनी त्यांना सुचविले आहे.