शनिवार, 8 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 15 ऑगस्ट 2021 (11:11 IST)

राज्याचे मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला स्वातंत्र्यदिनी आवाहन केलं

State Chief Minister Uddhav Thackeray appealed to the people on Independence Day Maharashtra News Regional News In Marathi Webdunia Marathi
आज भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन आहे.हा अमृत महोत्सव संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची राजधानी दिल्लीच्या लालकिल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला.आणि देशाला संबोधित केले.
 
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या मंत्रालयात ध्वजारोहण केले गेले.या वेळी महाराष्ट्राला संबोधित करत ते म्हणाले.की यंदाचे वर्ष कोरोनाच्या सावट खाली आहे,पण पुढचा स्वातंत्र्य दिन कोरोनामुक्त होऊन साजरा करू.या साठी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे हे जनतेचं कर्तव्य आहे.'कोरोनाला महाराष्ट्रातून आणि या देशातून मुक्त करण्याचे संकल्प आपण घेऊ या.' राज्यात लसीकरणाची मोहीम वेगाने सुरु आहे.राज्यात काल साडे नऊ लाख लोकांची लसीकरणाची नोंद झाली आहे. 
 
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध जरी शिथिल केले आहे तरी कोरोना आपल्या मधून गेलेला नाही, कोरोना अद्याप आहे.कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक नियमाचं काटेकोर पालन जनतेनं करावं.सामाजिक अंतर राखणे,हाताला वारंवार धुणे,मास्क वापरणे,सेनेटाईझरचा वापर करणे.या सर्व नियमांचं पालन करून आपण स्वतःला आणि इतरांना कोरोनाचा बळी जाण्यापासून रोखू शकतो.  
 
कोरोनाचे निर्बंध शिथिल केले असले, तरी काळजी घेऊनच राहायचे आहे.असं काहीही करू नका जेणे करून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल आणि पुन्हा लॉक डाऊन लावावे लागतील.लॉक डाऊन लावल्याने सर्वसामान्यांचे हाल होतात.त्यामुळे सुजाण नागरिक बनावे आणि दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं.