शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (13:42 IST)

आमचं सरकार असतं तर 15 मिनिटांत चिनी सैन्याला हाकललं असतं- राहुल गांधी

"पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरट आहेत, त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचं सरकार असतं तर तर 15 मिनिटांत चिनी सैन्याला हाकललं असतं," असं वक्तव्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलं आहे.
 
हरियाणामधल्या सभेत ते बोलत होते.
 
संपूर्ण जगात एकमेव असा देश आहे की, ज्या देशात चीनचं सैन्य आलं. भारताची जमीन चीननं हडप केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरट आहेत, असं राहुल यांनी म्हटलं.
 
चीननं भारताचा भूभाग बळकावल्याचा आरोप करताना राहुल गांधींनी म्हटलं, "पंतप्रधानीच चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. 1 हजार 200 चौरस किलोमीटर जमीन त्यांनी चीनला देऊन टाकली आणि मोदी स्वतःला देशभक्त म्हणवतात. चीनमध्ये एवढी हिंमतच नव्हती की आपल्या देशात पाऊलही ठेवतील. पण या घाबरट आणि कायर पंतप्रधानांमुळे चीनची एवढी हिंमत झाली."