महागाईचा वाढलेला दर, कच्च्या तेलाच्या किंमतींनी मोडलेले सारे विक्रम आणि आशियाई बाजारात सातत्याने सुरू असलेल्या मंदीच्या वादळाचा फटका मुंबई शेअर बाजाराला बसला. सोमवारी 300 हून अधिक अंशांनी बाजार घासरल्यानंतर मंगळवारी बाजारात 500 अंशांची विक्रमी घसरण झाल्याने 15 महिन्यांनंतर प्रथमच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 13 हजारांखाली आला. आणि बाजार 12 हजार 961. 68 अंशांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्येही 141 अंशांची घसरण दिसून आली. आणि निफ्टी 4000 अंशांहून खाली आला. देशात सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणामही भारतीय बाजारावर दिसून आल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अणुकराराबाबत डाव्या पक्षांनी सरकार विरोधात पुकारलेल्या असहकारामुळे गुंतवणूकदारांच्या मनात सरकार कोसळण्याची भीती कायम आहे. याचाही परिणाम बाजारावर दिसून आला आहे.
|