मुख्य पृष्ठ > धर्म > श्रद्धा -अंधश्रद्धा > लेख
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
कुंडलीत ठाण मांडलेला कालसर्प योग
श्रुति अग्रवाल


ShrutiWD
ठरवता एक आणि घडते दुसरेच असे कुणाच्या आयुष्यात घडत नाही? पण यासाठी तुम्ही ग्रहांना जबाबदार धराल? काही जण म्हणतील हा सगळा मुर्खपणा आहे. पण काहीजण मात्र यावर ठामपणे विश्वास ठेवतील. तर असे हे अनिष्ट घडवून आणणारे ग्रह तुमच्या कुंडलीत येऊन बसले की त्याला कालसर्प योग असे म्हणतात. आणि या ग्रहांना शांत करण्यासाठी म्हणे कालसर्पाची शांती करावी लागते. श्रद्धा आणि अंधश्रद्धाच्या या भागात याचाच शोध घेण्याचे ठरविले. त्यासाठी नाशिकजवळचे त्र्यंबकेश्वर गाठले.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर आता ज्योतिर्लिंगापेक्षाही कालसर्पयोग शांती, नारायण नागबली यांच्या पूजेसाठी जास्त प्रसिद्ध झाले आहे. हजारो लोक येथे कालसर्प शांतीसाठी येतात. म्हणूनच मीही तेथे गेले. नाशिकला पोहोचल्यानंतर त्र्यंबकेश्वरसाठी वाहनाची शोधाशोध सुरू होती. तेव्हा एका टॅक्सीवाल्याने त्र्यंबकेश्वरला येण्याची तयारी दर्शवली.

गणपत नावाचा हा टॅक्सी चालक चांगलाच बोलका होता. टॅक्सी
ShrutiWD
त्र्यंबकेश्वरच्या दिशेने धावू लागताच, त्याने बोलायला सुरवात केली. कुणाकडे जायचंय, पासून सुरू झालेली चर्चा अनपेक्षितपणे कालसर्प योगापर्यंत गेल्यानंतर त्याची कळी खुलली. मग त्याने माझीच उलटतपासणी घ्यायला सुरवात केली. तुम्हाला काय अडचण आहे? पूजा करायचीय का? कालसर्प योग शांती करायची की नारायण नागबली? अशी प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली. एवढे विचारूनही तो थांबला नाही. येथील कुणी भिक्षुक (ब्राह्मण) माहिती नसल्यास माझ्या परिचयातील एक भिक्षुक आहेत. ते सगळं व्यवस्थित करतील. त्याने अगदी विश्वासाने सांगितलं.


त्याच्याशी बोलताना त्र्यंबकेश्वरला रोज शेकडो लोक कालसर्प योगापासून सुटका करण्यासाठी येत असल्याचे कळले. याविषयीची इतर रंजक माहितीही त्याच्याकडून समजली. बोलता बोलता आमची गाडी त्र्यंबकेश्वरमध्ये कधी आली ते कळलेच नाही. गावात शिरताच महामृत्युंजय जप, शिवस्तुतीच्या आवाजाने आसमंत भारून गेला होता. सुरवातीला येथील पवित्र कुशावर्त कुंडावर गेले. तेथे भाविकांची चांगलीच गर्दी होती. स्नानानंतर सर्वजण अंगाभोवती पांढरे वस्त्र गुंडाळत होते. नारायण नागबली किंवा कालसर्प योगासाठी शुभ्र वस्त्रच आवश्यक असते, असे चर्चेत कळले होते. त्यामुळे हे सर्व त्यासाठीच येथे आल्याचे जाणवत होते.

ShrutiWD
यासंदर्भात खाडे नावाच्या एका कुटुंबाशीच बोलले. हे कुटुंबीय यवतमाळहून कालसर्प पूजेसाठीच आले होते. कुटुंबप्रमुख सुरेशचंद्र खाडे यांच्याशी बोलले तेव्हा समजले, की त्यांची मुलगी श्वेताचे लग्नच होत नाहीये. ब्राह्मणाला विचारले तर तो म्हणतो, की तिच्या कुंडलीतील कालसर्प दोषाचे निवारण होईपर्यंत तिचे लग्न जुळणार नाही. श्वेताची आई किरण यांनी सांगितले, की त्यांच्या परिचितांपैकी एका मुलाच्या कुंडलीतही कालसर्प दोष होता. त्यामुळे त्याचेही लग्न होत नव्हते. त्यांनी पूजा केल्यानंतर मात्र हा दोष दूर झाला आणि त्याचे लग्नही झाले.खाडे कुटुंबीयांसारखी अनेक कुटुंबे येथे कालसर्प दोष निवारणासाठी येतात. विशेष म्हणजे यात उच्चशिक्षतांचे प्रमाण मोठे होते. किंबहूना त्यांचीच संख्या जास्त होती.

फोटो गॅलरी बघण्यासाठी येथे क्लिक करा
व्हिडिओ पाहा
1 | 2  >>  
फोटो गॅलरी
कुंडलीत ठाण मांडलेला कालसर्प योग
वेबदुनिया चर्चा
समाज शिक्षित होवूनही अंधश्रद्धा वाढण्यामागचे कारण काय?
आणखी
तोंडाद्वारे मुतखडा काढणारी आजी  
फोनवरून विष उतरवणारे हेडसाहेब  
मद्यपान करणारी कालभैरवाची मूर्ती  
अश्वत्थामा कोण ?