कुंडलीत ठाण मांडलेला कालसर्प योग
|
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर आता ज्योतिर्लिंगापेक्षाही कालसर्पयोग शांती, नारायण नागबली यांच्या पूजेसाठी जास्त प्रसिद्ध झाले आहे. हजारो लोक येथे कालसर्प शांतीसाठी येतात. म्हणूनच मीही तेथे गेले. नाशिकला पोहोचल्यानंतर त्र्यंबकेश्वरसाठी वाहनाची शोधाशोध सुरू होती. तेव्हा एका टॅक्सीवाल्याने त्र्यंबकेश्वरला येण्याची तयारी दर्शवली.
गणपत नावाचा हा टॅक्सी चालक चांगलाच बोलका होता. टॅक्सी
|
त्याच्याशी बोलताना त्र्यंबकेश्वरला रोज शेकडो लोक कालसर्प योगापासून सुटका करण्यासाठी येत असल्याचे कळले. याविषयीची इतर रंजक माहितीही त्याच्याकडून समजली. बोलता बोलता आमची गाडी त्र्यंबकेश्वरमध्ये कधी आली ते कळलेच नाही. गावात शिरताच महामृत्युंजय जप, शिवस्तुतीच्या आवाजाने आसमंत भारून गेला होता. सुरवातीला येथील पवित्र कुशावर्त कुंडावर गेले. तेथे भाविकांची चांगलीच गर्दी होती. स्नानानंतर सर्वजण अंगाभोवती पांढरे वस्त्र गुंडाळत होते. नारायण नागबली किंवा कालसर्प योगासाठी शुभ्र वस्त्रच आवश्यक असते, असे चर्चेत कळले होते. त्यामुळे हे सर्व त्यासाठीच येथे आल्याचे जाणवत होते.
|
फोटो गॅलरी बघण्यासाठी येथे क्लिक करा
|
या दोष निवारणासाठी मुंबईहून आलेल्या प्रदीपकुमार सेन
| |
|
येथील पूजा पाहिल्यानंतर गावात इतरत्र फिरले. त्यावेळी सर्वत्र मंत्रांचे आवाज येत होते. सगळीकडे हीच पूजा चालली होती. काही ठिकाणी एकावेळी वीस वीस जणांची पूजा केली जात होती. या समूहासाठी तीन ब्राह्मण माईकच्या सहाय्याने मंत्रपठण करीत होते. ही पूजा पाहिल्यानंतर एका गोष्टीची मात्र खात्री पटली. या पूजेनंतर एखाद्याच्या आयुष्यातील कालसर्प योगाचे निवारण होऊन भगवंताची कृपा झाली की नाही हे माहित नाही, पण येथील भिक्षुकवर्गावर मात्र भगवंताची कृपादृष्टी मात्र नक्कीच झाली आहे. पूजेचा फायदा किती होतो किंवा नाही यासंदर्भात दोन्ही मते आढळली. काहींच्या मते फायदा होतो, काहींच्या मते आम्ही आमच्या मनाला समाधान वाटते म्हणून करतो.
आमची कुंडली दोषमुक्त व्हावी एवढेच आमचे म्हणणे आहे. कालसर्प योगाच्या बाबतीत प्राचीन ग्रंथात मात्र, काहीही लिहिलेले नाही. यापूर्वी पंधरा वीस वर्षांपूर्वी या पूजेचे एवढे प्रस्थही नव्हते. अचानक या पूजेविषयीची चर्चा सुरू झाली आणि येथील भिक्षुकांवर परमेश्वराची कृपादृष्टी झाली. विशेष म्हणजे ही पूजा येथेच होते. दुसरीकडे होत नाही. असे का याला कुणाकडे उत्तर नाही.
|
