प्रभू अय्यप्पांचे कोयीक्कल मंदिर
प्रभु अयप्पाच्या स्मृतीचे अद्धभूत पूजास्थळ
|
राजा पंडालम यांनी मानलेल्या मुलाच्या स्मृतीसाठी या व शबरीमला मंदिराची निर्मिती केली होती. भगवान अय्यप्पांनी तारूण्यातील कालावधी पंडालम येथे घालवल्यामुळे या मंदिराचे विशेष महात्म्य आहे. शबरीमलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक अगोदर कोयीक्कल मंदिरात दर्शनासाठी येतात. शबरीमला मंदिरात असलेल्या भगवान अय्यप्पांच्या मूर्तीस मकराविलकूच्या दिवशी पंडालम महालातून आणलेले दागिणे घालण्यात येतात. मकराविलकू
|
भगवान अय्यप्पांमुळेच हा चमत्कार शक्य असल्याचे मानण्यात येते. दागिने पंडालम येथून शबरीमलास नेण्यार्या शोभायात्रेच्या संरक्षणाची जबाबदारी पंडालमच्या राजघराण्याची आहे. राजघराण्यातील सदस्य यात सहभागी होतात. यावर्षी बारा जानेवारीस ही शोभायात्रा काढण्यात येईल.
|
प्रभू अय्यप्पांबाबत अनेक कथा आहेत. अय्यप्पांनी मानवाच्या रूपात पंडालमच्या राजाच्या घरी जन्म घेतल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यावेळी राजशेखर हे पंडालमचे राजे होते. एकेवेळी भगवान अय्य्प्पांची बालकाच्या रूपात राजा राजशेखर यांच्याशी गाठ पडली होती.
|
महाराणीचे सेवक व मंत्र्यांनी मणीकंठामुळे तिच्या स्वतःच्या पुत्रास राजगादीपासून वंचित रहावे लागेल, असे तिच्या कानात भरविले. मणिकंठास राजगादीपासून दूर करण्यासाठी राणीने कारस्थान रचले. राजवैद्यास फितवून मणिकंठास त्याच्या आईचे प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात आले. तिच्या जिवाच्या रक्षणासाठी चित्त्याचे दूध आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
आईचा जीव वाचवण्यासाठी मणिकंठाने चित्त्याचे दूध आणले. पण लवकरच आपल्याविरूद्ध कारस्थान केल्याचे त्याच्या लक्षात आले. मणिकंठ सामान्य युवक नसून त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याचे यावेळी सर्वांना समजले. मणिकंठाने राजमहल सोडण्याचा निर्णय घेतला. राज्यासही कारस्थानाची माहिती झाली. त्याने मणिकंठास न जाण्याची विनंती केली.
| |
|
जाण्याचा मार्ग : येथे पोहचण्यासाठी प्रथम पंडालम गाठावे लागेल. येथून सुमारे एक किलोमीटरवर हे मंदिर आहे. विमानाने जायचे झाल्यास थिरूवनंतपुरम हे येथील जवळचे विमानतळ आहे. येथे रेल्वेनेही पोहचता येते. चिनगनूर हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
