शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 2 एप्रिल 2016 (10:42 IST)

'बालिकावधू' फेम प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या

'बालिकावधू' या कार्यक्रमातून 'आनंदी'ची भूमिका साकारून प्रेक्षकांचे मन जिंकणार्‍या प्रत्युषा बॅनर्जी हिने या जगाचा निरोप घेतला. प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूमुळे टीव्ही कलाकारांना मोठा धक्का बसला सहकलाकारांनी तिच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मात्र तिने आत्महत्या केली यावर अद्याप कोणाचाच विश्वास बसला नसून तिच्यासारखी खंबीर मुलगी असे पाऊल उचलणार नाही, असेच अनेकांचे म्हणणे आहे. 
 
प्रत्युषाचा सहकलाकार आणि अभिनेता अजाज खाननेही असेच मत व्यक्त केले असून ' प्रत्युषाचा मृत्यू ही आत्महत्या नसून सुनियोजित हत्या आहे' असा दावा त्याने केला आहे. अभिनेत्री डॉली बिंद्रानेही तिच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करतानाच तिच्यासारखी खंबीर मुलगी आत्महत्येसारखे पाऊल उचलणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. 
 
शुक्रवारी संध्याकाळी गोरेगावमधील राहत्या घरी प्रत्युषाने गळफास लाऊन आत्महत्या केली. तिला उपचारांसाठी तातडीने कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिला मृत घोषित करण्यात आले. प्रियकरासोबत सुरु असलेल्या वादामुळे हे पाऊल उचलले असल्याची माहिती मिळत आहे.