शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जून 2015 (12:50 IST)

माझ्याविषयी दुसरे काय विचार करतात याचा मला फरक पडत नाही

‘तनू वेडस् मनू रिटनर्स’ या सिनेमाच्या यशानंतर बॉलिवूड क्वीन कंगनादेखील भलतीच चर्चेत आली आहे. कायमच आपल्या वेगळेपणामुळे खास ठसा उमटविणार्‍या कंगनाचं म्हणणं आहे की, दुसरे माझ्याबाबत काय विचार करतात याचा मला अजिबात फ़रक पडत नाही.
 
माझ्याविषयी इतर जण काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही. त्यांचा विचार मी करत बसले असते तर आतापर्यंत टिकाव धरु शकले नसते. असं कंगनाने एका प्रश्नाला सडेतोड उत्तर दिलं.
 
आपण काय मिळवू शकतो आणि काय नाही याची मला चांगली समज आहे. जर मी इतरांच्या म्हणण्याने प्रभावित झाले असते तर माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं असतं, असंही कंगना म्हणाली.
 
‘फॅशन’ सिनेमासाठी कंगनाला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर ‘क्वीन’ या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.