शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2016 (16:30 IST)

रणबीर-कॅटरीना : अजब प्रेम की गजब कथेचा अंत!

राजकुमार संतोषीचे चित्रपट 'अजब प्रेम की गजब कहानी'च्या शूटिंग दरम्यान रणबीर कपूर आणि कॅटरीना कैफची प्रेमकथा सुरू झाली होती. गंमत म्हणजे या चित्रपटात सलमानने देखील एक लहानसा रोल केला होता ज्यात रणबीर कपूर म्हणतो की 'मेरी गर्लफ्रेंड को मत ले उड़ना' आणि हे सत्य झालं.   
 
मागील काही दिवसांपासून रणबीर आणि कॅटरीनामध्ये ब्रेकअपच्या बातम्या आल्या आहेत, पण रणबीर आणि कॅटरीना अचानक सोबत येऊन या चर्चेला तेथेच विराम लावतात. ते आपले नातं टिकवण्यात लागले होते, पण आता हे शक्य दिसत नाही आहे.  
 
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार रणबीर-कॅटरीनाने आपल्या प्रेम कथेला संपवण्याचा निर्णय घेतला आहे. बांद्रा स्थित ज्या डुपलॅक्समध्ये ते दोघेही सोबत राहत होते, तेथून आता कॅटरिनाने आपले सामान बांधले आहे आणि रणबीर कपूर आपल्या आई वडिलांजवळ परत आला आहे.  
 
एवढंच नव्हे, अनुराग बसुचे चित्रपट 'जग्गा जासूस'च्या शूटिंगमध्ये देखील तो 6 दिवसांपासून जात नसल्यामुळे त्यांचे वेगळ्या होण्याची चर्चा अधिक रंगली आहे.    
 
असे सांगण्यात येत आहे की या ब्रेकअपआधी कॅटरीना आपल्या एक्स बॉयफ्रेंड सलमान खानशी बराच वेळ बोलली होती. शक्य आहे की तिने सलमानचा सल्ला घेऊन हा निर्णय घेतला असावा.  
 
महत्त्वाचे म्हणजे की रणबीर या अगोदर दीपिका पादुकोणसोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि कॅटरीनाच नात सलमानसोबत होत. नंतर रणबीर-कॅटरीनाच जमलं आणि अस वाटत होते की दोघेही लग्न करणार आहे, पण आता हे काही शक्य होईल असे दिसून येत नाही आहे. तरी बघावे....