शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By WD|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 15 एप्रिल 2014 (11:48 IST)

प्रियांका गांधी दारु पितात- स्वामी

वाराणसीतून निवडणूक लढविली असती तर प्रियांका गांधी यांचा दारुण पराभव झाला असता,  कारण त्या दारु खूप पितात आणि त्या बदनाम आहेत, असे खळबळजनक वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे सुब्रमण्यम स्वामी यांनी केले.

कांग्रेस अध्यक सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी यांची वाराणसीमधून नरेन्द्र मोदी यांच्याविरुध्द लढण्याची इच्छा होती,  असे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिध्द झाले. त्यावर स्वामी यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

स्वामी म्हणाले,  'त्यांनी प्रियंका यांना वाचवले. त्याचा दारुण पराभव झाला असता. त्या लोकांमध्ये खूप अप्रिय आहेत. त्या खूप मद्यपान करतात आणि त्यांचे व त्यांच्या पतीचे नाव खराब झालेले आहे. ' तत्पूर्वी, स्वामी यांनी रविवारी बोलताना,  वडिलांची हत्या करणार्‍यांना  तुरुंगात भेटायला जाणार्‍या प्रियांका गांधी कृतघ्न आहेत अशी टीका केली होती. तसेच, वरुण गांधी नव्हे तर प्रियांका गांधी भरकटल्या आहेत. प्रियंका आणि त्यांचा पक्ष वरुण गांधी यांचे यश पचवू शक्ले नाहीत.