शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

मनाचीये द्वारी उभा क्षणभरी

निर्गुण  निराकार  निर्विचार अवस्था  केव्हा  प्राप्त होते ? जेव्हा  तनाने,मनाने  एकचित्त  होवून  गुरुचरणी लीन  होवून  स्मरण  केल्यानंतर  आलेली  प्रचिती !
त्याकरिता  आपलाची  वाद  आपणासि  व्ह्यायला  हवा. मनाची  नितळता  आपोआप  अनुभवायास  मिळते. जेथे सांसारिक  मोठ्या  वाटणार्या  समस्या अगदी  य:कश्चीत  होवून  त्याचा  विसर  पडतो.  त्यासाठी  चिंतन, मनन आवश्यक  आहे. प्रत्येकाचे  स्वतःचे  असे  छोटे - मोठे  आकाश  आहेच.  फक्त  आवश्यकता  आहे  ते शोधण्याची ! 
म्हणूनच  'मनाचीये  द्वारी  उभा  क्षणभरी' अनूभवून  तर  बघा !
आपणास  सर्व  दिवस आरोग्य सम्पन्न  तथा  मंगल  जावो ! शुभम  भवतू  !  
- स्नेहल  खंडागळे