1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जुलै 2023 (16:14 IST)

Nilavanti Granth मृत्यूकडे नेणारा त्या शापित ग्रंथावर भारतात बंदी का आहे ?

granth
Nilavanti Granth banned in India:भारत हा धर्मग्रंथांचा आणि महाकाव्यांचा देश आहे. अगणित ग्रंथ प्राचीन काळापासून वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि लिपींमध्ये लिहिले गेले आहेत, जे आजही लोक वाचतात आणि मार्गदर्शन करतात. या महाकाव्यांचे व ग्रंथांचे पठण करणे अत्यंत शुभ व लाभदायक मानले जाते. पण आपल्या देशात असे एक शापित पुस्तक आहे, ज्याबद्दल असे म्हटले जाते की जो वाचतो तो एकतर मरतो किंवा वेडा होतो. निलावंती ग्रंथ असे या शापित ग्रंथाचे नाव आहे.
 
यक्षिणीने निलावंती ग्रंथ लिहिला
निलावंती हा ग्रंथ निलावंती नावाच्या यक्षिणीने लिहिला होता, परंतु तो लिहिल्यानंतर काही कारणास्तव तिने शाप दिला की जो कोणी हा ग्रंथ वाईट हेतूने वाचेल त्याचा मृत्यू होईल. दुसरीकडे, जो निलावंती ग्रंथ अपूर्ण वाचतो तो वेडा होईल. त्याचे मानसिक संतुलन बिघडेल. निलावंती ग्रंथासंबंधीचा हा समज महाराष्ट्रासह दक्षिण भारतात सामान्यतः प्रचलित आहे.
 
...निलावंती ग्रंथात असे काय आहे?
असे प्रश्न पडतात की या पुस्तकात काय आहे किंवा हे पुस्तक कशाबद्दल आहे. याचे उत्तर असे की, हे असे पुस्तक आहे ज्याचा अभ्यास करून माणूस प्राणी-पक्ष्यांशी बोलू शकतो किंवा दडलेला खजिना शोधू शकतो. पण या पुस्तकाला दिलेल्या शापामुळे ते शक्य होत नाही.
 
भारतात निलावंती ग्रंथावर बंदी आहे का?
निलावंती ग्रंथाचे वर्णन हिंदी साहित्यात आढळते, परंतु आता हा ग्रंथ कुठेही आढळत नाही. हे पुस्तक शापित असल्यामुळे भारतात बंदी आहे, असेही म्हटले जाते. मात्र, याचा कुठेही पुरावा नाही. निलावंती ग्रंथाचे काही भाग इंटरनेटवर सापडले असले तरी ते खरे आहेत की नाही याबद्दल काहीही सांगता येत नाही. तसेच या पुस्तकाशी निगडीत तथ्ये खरी आहेत की नाही याबद्दलही.
 
(Disclaimer:येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया त्याची पुष्टी करत नाही.)