गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

हनुमानाने रामायण लिहून समुद्रात का फेकली, जाणून घ्या रहस्य!

आम्हाला सर्वांनाच माहीत आहे की रामायणाची रचना महर्षी वाल्मीकीने केली होती, पण ही बाब फारच कमी लोकांना माहीत आहे की एक रामायण हनुमानाने देखील लिहिले होते. ज्याला हनुमद रामायणाच्या नावाने ओळखले जाते. पण स्वत:  हनुमानाने याला लिहिल्यानंतर समुद्रात फेकले होती. पण त्यांनी असे का केले, हे जाणून घेऊ.  
 
शास्त्रानुसार सर्वात आधी रामकथा हनुमानाने आपल्या नखांनी एका खडकावर लिहिली होती. ज्याला त्यांनी वाल्मीकी यांनी लिहिलेल्या रामायणाच्या आधी लिहिली होती.  
लंकेवर विजय मिळवल्यानंतर राम अयोध्येत राज्य करू लागले होते तेव्हा हनुमान हिमालयावर जाऊन शिव तपस्या करत होते त्या दरम्यान रोज नखाने राम कथा लिहितं होते.  
महर्षी वाल्मीकी देखील रामायण लिहिल्यानंतर महादेवाला याला समर्पित करण्याच्या उद्देशाने कैलास पर्वतावर पोहोचले. तेथे हनुमानाने लिहिलेले हनुमद रामायण बघून वाल्मीकी निराश झाले.  
महर्षी वाल्मीकीला निराश बघून हनुमानाने हनुमद रामायणाच्या खडकाला एका खांद्यावर आणि दुसर्‍या खांद्यावर महर्षी वाल्मीकींना बसवून समुद्रात घेऊन गेले आणि त्या खडकेला समुद्र बुडवून दिले. तेव्हा पासून हनुमानाने लिहिलेले रामकथा कुठेही उपलब्ध नाही आहे.