शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

कपाळावर कुंकू का लावतात?

विवाहित स्त्रिया भांगेत शेंदूर भरतात हे तर सर्वांनाच माहीत असेल पण यामागील कारण काय? हे विचारल्यावर केवळ यामागे केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारणंदेखील आहेत. 
 
कुंकाने ताण दूर होतं
कुंकात मरकरी अर्थात पारा असतो. कुंकूमध्ये पाण्यासारखा धातू अधिक प्रमाणात असल्याने कुंकू लावल्याने ताण दूर होतं आणि डोकं शांत राहतं. लग्नानंतर कुंकू लावण्यामागील कारण आहे की याने रक्त संचार सुधारण्यासह यौन क्षमतादेखील वाढते. 
 
सौंदर्य वाढतं
कुंकू लावल्याने महिलांचा सौंदर्यामध्ये अजून भर पडते अर्थातच महिलांचे सौंदर्य खुलून उठते. कुंकू लावण्याने चेहर्‍यावर वेळेपूर्वी सुरकुत्या पडत नाही. तसेच कुंकू महिलांच्या शरीरात विद्युत ऊर्जा नियंत्रित करतो. कुंकू लावताना आपल्या भांगाच्या आज्ञाचक्र वर दाब दिला जातो त्यामुळे तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्‍याच्या स्नायूंना चांगला रक्तपुरवठा होतो.
 
एकाग्रता वाढते
योग विज्ञानाच्या दृष्टीने कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला गेलेला आहे. आज्ञा चक्र महिलांच्या मनाला नियंत्रित करत असते. जेव्हा आज्ञा चक्रावर दबाव पडतो तेव्हा मन एकाग्र केले जाते. आज्ञा चक्रावर स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे त्यांचे मन एकाग्र राहण्यास मदत होते.
 
वैज्ञानिक कारण
भांगेत कुंकू लावणे हे केवळ रूढी परंपरा आहे की त्या मागे काही वैज्ञानिक कारण आहे जानुया, ब्रम्हरंध आणि अध्मि नावाचे मर्मस्थान बरोबर वरच स्त्रिया कुंकू लावतात. त्यालाच सामान्य भाषे मध्ये भांग असे बोलतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांचा भांग ची जागा खूप कोमल असते.