1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 8 जानेवारी 2020 (13:52 IST)

राज्यातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही : मुख्यमं‍त्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योगपतींची भेट घेतली. उद्योगांना येणार्‍या सर्व अडचणी व समस्या दूर करणार, तसेच राज्यातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी उद्योग क्षेत्रातील प्रमुखांना दिली.
 
राज्य शासन आणि सीआयआय यांच्या संयुक्त विमाने सह्याद्री शासकीय अतिथीगृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास अनेक बड्या उद्योजकांनी उपस्थिती लावली. रतन टाटा, मुकेश अंबानी, उदय कोटक, आनंद महिंद्रा, आदी गोदरेज, हर्ष गोयंका, मानसी किर्लोस्कर, राजेश शहा, आनंद पिरामल, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, वरुण बेरी, महेंद्र तुराखिया, रवी रहेजा, बाबा कल्याणी, गोपिचंद हिंदुजा, सज्जन जिंदाल, गौतम सिंघानिया आदी उद्योगपतींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधला.