शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

तिसर्‍या पंचांना जादा अधिकार हवे: सचिन

मुंबई- खेळाडूंनी डिसीजन रिव्ह्यू सीस्यीमचा वापर केला नाही, तर तिसर्‍या पंचांनी योग्य निर्णय द्यावा आणि त्यासाठी त्यांना जादा अधिकार बहाल करावेत, असे माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने म्हटले आहे. 
 
डीआरएस घेतल्यानंतरही मैदानावरील दोन पंचांसह तिसर्‍या पंचांनी एकत्रितपणे निर्णय घ्यावा, असेही सचिनने म्हटले. एक टीम म्हणून तीन पंचांनी काम करावे. तिसर्‍या पंचांना काही खटकले तर त्यांनी ते तातडीने मैदानावरील पंचांना लक्षात आणून द्यावे. यामुळे योग्य निर्णय घेतला जाईल, असे सचिनने एका मुलाखतीत म्हटले आहे. डीआरएस घेण्याबाबत नॉन स्ट्राईकरवर उभ्या असलेल्या फलंदाजाची जबाबदारी असते, असे ‍सचिनला वाटत नाही.