शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 26 ऑक्टोबर 2015 (09:54 IST)

टीम इंडियाचा दुसरा सर्वात मोठा पराभव

मुंबई- पाच एकदिवसी सामन्यांची मालिका गमावत टीम इंडियाला या मालिकेतील तिसर्‍या पराभवास सामोरे जावे लागले. 
 
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करीत तीन शतकी खेळाच्या जोरावर 4 बाद 438 धावा केल्या. भारताचा संघ पूर्ण 50 षटके न खेळता 36 षटकात सर्वबाद 224 धावांत गडगडला. दक्षिण आफ्रिकेने अंतिम सामना 214 धावांनी जिंकला व एकदिवसीय मालिका 3-2 ने जिंकली.
 
क्रिकेटच्या इतिहासात भारताचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी श्रीलंकेने 29 ऑक्टोबर 2000 रोजी शारजामध्ये भारताचा 245 धावांनी पराभव केला होता.