गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (08:15 IST)

रसगुल्ला खाल्ल्याने हे 3 रोग मुळापासून नष्ट होतात

आपल्या आरोग्याला चांगले ठेवण्यासाठी लोक चांगल्या उत्तम टिप्सचे अनुसरणं करतात. अश्या परिस्थितीत आज आम्ही आपल्याला आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि आजाराला दूर करण्यासाठी एक चांगला उपाय सांगत आहोत. वास्तविक हा उपाय रसगुल्ल्याशी निगडित आहे. होय, तसं तर रसगुल्ला सर्वांनाच आवडतो. ही एक बंगाली मिठाई आहे. रसगुल्ला खाण्यात देखील खूप मजा येते. पण आपल्याला हे माहितीच नसणार की रसगुल्ला खाण्याचे अनेक फायदे आहेत. इथे आपल्याला सांगू इच्छितो आहोत की रसगुल्ला खाल्ल्यानं 3 आजार मुळापासून दूर होतात. 
 
रसगुल्ला खाल्ल्याने होणारे फायदे - 
कावीळ झाली असल्यास हे आवर्जून खा. फार कमी लोकांना हे माहीत आहे की ज्यांना कावीळचा त्रास आहे, त्या लोकांनी दररोज सकाळी एक पांढरा रसगुल्ला आवर्जून खावा. असे केल्याने त्यांचा काविळीचा त्रास कायमस्वरूपी संपेल. 
 
लघवीचा त्रास कमी होतो -
ज्या लोकांना लघवी करताना जळजळीचा त्रास जाणवतो, त्यांच्यासाठी पांढरा रसगुल्ला एक रामबाण औषध आहे. होय, अश्या लोकांनी दररोज एक पांढरा रसगुल्ला खावा.
 
डोळ्यांसाठी चांगले आहे - 
आपल्याला सांगू इच्छित आहोत की जर का आपल्या डोळ्यांमध्ये जळजळ होतं असल्यास किंवा डोळे पिवळे होतं असतील तर, दररोज एक पांढरा रसगुल्ला आवर्जून खावा. कारण यामुळे डोळे निरोगी राहतात आणि दृष्टी देखील चांगली होते. 
 
कॅल्शियमचा पुरवठा - 
रसगुल्ला हा छेना म्हणजेच पनीर पासून बनलेला असतो. म्हणून दुधात आढळणारे एक निरोगी घटक कॅल्शियम मुबलक प्रमाणात देते. या मुळे शरीरातील हाडं बळकट होतात. 
 
एकंदरीत रसगुल्ला खाणं आपल्यासाठी आरोग्यदायी आहे. यामध्ये दुधाचे सर्व गुणधर्म असतात. आणि हे पचण्यासाठी सोपं असतं. म्हणजेच ईझी टू डायजेस्ट असतं. 
 
पौष्टिक मूल्य - 
100 ग्रॅम रसगुल्ल्यात 186 कॅलरीज असतात. ज्यामध्ये 153 कॅलरीज कार्बोहायड्रेट्स आणि 17 कॅलरीज फॅट आणि 16 कॅलरीज प्रथिनं असतात.