गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 15 जानेवारी 2024 (16:50 IST)

रात्री किती पाणी सेवन करावे? का पाणी सेवनच करू नये? चला जाणून घेऊ या

How much water to drink at night
Whether to drink water at night or Not- तुम्हाला महित आहे का अति पाणी सेवनाने पण नुकसान होते. यामुळे किडनी आणि पोटाचे आजार देखील होऊ शकतात. वॉटर रिटेंशन मूळे पण वजन वाढते. अधिक पाणी किंवा शरीरातील वाचलेले पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे बैलेंस बिघडवते. सोडियमला कमी करून मेंदूला आणि डोळ्यांच्या खाली सूज आणते. खासकरून रात्री किती पाणी सेवन केले पाहिजे तसेच, सेवन पण करावे की नाही करावे हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे.
 
पाणी किती सेवन केले पाहिजे-
* तहान लागेल तेव्हाच पाणी सेवन केले पाहिजे.
* २४ तासात कमीत कमी २ लीटर पाणी सेवन केले पाहिजे.
* पर्याप्त पाण्याच्या सेवनाने याचा काही हिस्सा आपल्या मांसपेशी मध्ये स्टोर होतो. ज्यामुळे भविष्यात गरज पडल्यावर शरीरात याचा प्रयोग होईल ही शरीराची एक नैसर्गिक  प्रक्रिया आहे. 
* जेवण झाल्यानंतर पाणी हे कधीच सेवन करू नका तसेच उभे राहून देखील पाणी सेवन करू नये, थंड पाण्याचे  सेवन करू नये 
तसेच खूप कमी किंवा खूप जास्त पाणी सेवन करू नये.
 
रात्री पाणी पिण्याचे नुकसान-
१. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने  मूत्राशयाच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
२. अतिप्रमाणात पाणी सेवन मूत्राशयाला अतिसक्रिय करू शकते आणि यामुळे संसर्ग  होऊ शकते. 
३. झोपण्यापूर्वी अति पाणी सेवनाने हृदयाचे विकार होण्याची शक्यता असते. कारण अति पाणी सेवनाने सारखे बाथरूमला जावे लागेल आणि जर एकदा झोप मोडली तर पहिल्या सारखी  झोप येत नाही. 
४. आशा स्थितीत बीपी वाढू शकते, स्ट्रेस होऊ शकतो, शुगर वाढू शकते ही सगळी कारण हृदयाच्या आजाराला जन्म देतात. 
५. जर तुम्ही हार्ट, बीपी, डायबिटीज, किडनी, मूत्राशय किंवा ब्लडप्रेशर यांनी ग्रस्त आहात तर झोपण्यापूर्वी कधीच पाणी सेवन करू नका. 
 
रात्री किती प्रमाणात पाणी सेवन केले पाहिजे -
१. रात्री लवकर जेवण करावे तसेच झोपण्यापूर्वी 2 तासांपूर्वी  पाणी सेवन करावे.
२. याच बरोबर काही तज्ञांचे म्हणणे आहे की, झोपण्यापूर्वी जर तुम्ही अर्धाच ग्लास पाणी सेवन करत असाल तर याने शरीरात रक्ताचा पुरवठा सुचारु, रूपाने चालत राहतो जो तुम्हाला ह्रदय विकराचा झटका येण्यापासून वाचवतो. 
३. तसेच रात्रीचे जेवण झाल्यानंतर 1 तासाने पाणी सेवन करून मग2 तासांनी झोपावे.