1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

Fitkari Vastu Tips तुरटीने समस्या लगेच दूर होतात, धनप्राप्ती होऊन सुख-समृद्दी येते

Fitkari Vastu Tips वास्तुशास्त्रामध्ये दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. जसे मीठ, हळद, तुरटी इतर. या साध्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये जीवनातील अनेक प्रकारचे वास्तू दोष आणि समस्या दूर करण्याची ताकद असते.
 
घरात वास्तुदोष असल्यास सर्व प्रकारचे अडथळे आणि समस्या येतात. वास्तुशास्त्रात वास्तू दोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. इतकचं नव्हे तर घराच्या स्वयंपाकघरात असे अनेक साहित्य आहेत, जे वास्तूशी संबंधित दोष दूर करण्यात मदत करतात. आज आम्ही तुम्हाला तुरटीशी संबंधित काही वास्तु उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही घरातून नकारात्मक ऊर्जेचा प्रवेशच थांबवू शकता तसेच तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकता, आरोग्य सुधारू शकता आणि मानसिक शांती मिळवू शकता. चला जाणून घेऊया तुरटीने घरातील वास्तुदोष कसे दूर होतात.
 
तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये वास्तुशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास ती दूर करण्यासाठी 50 ग्रॅम तुरटीचा तुकडा घ्या आणि घराच्या किंवा ऑफिसच्या प्रत्येक खोलीत किंवा कोपऱ्यात ठेवा, जिथे इतर कोणालाही दिसणार नाही. याने विविध वास्तुदोषांमुळे होणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि तुमच्या घरात सुख-शांतीसोबतच संपत्तीतही वाढ होईल.
 
लक्षात ठेवा की तुरटीचा रंग काही दिवसांनी बदलू लागला की त्याऐवजी नवीन तुरटी ठेवा. यामुळे वास्तुशी संबंधित विविध समस्या कमी होतील आणि सुख-शांतीसोबतच धन-समृद्धी वाढेल.

व्यवसायात प्रगती मंद असेल किंवा नोकरीत प्रगती होत नसेल तर लाल कपड्यात तुरटीचा तुकडा बांधून मुख्य दरवाजावर लटकवावा. तुरटीच्या या उपायाने तुम्हाला खूप फायदा होईल.
 
झोपण्यापूर्वी काळ्या कपड्यात तुरटी बांधून उशीखाली ठेवल्यास वाईट स्वप्ने पडत नाहीत आणि अज्ञात भीतीपासून मुक्ती मिळते.
 
तुरटीचा उपायही आर्थिक लाभासाठी प्रभावी ठरू शकतो. यासाठी तुरटीचा वापर घराची मॉपिंग करताना करता येतो. या उपायाने घरातील सदस्यांचे आजार कमी होतील आणि त्यांची आर्थिक स्थितीही सुधारेल.
 
कधी-कधी अंघोळीच्या पाण्यात तुरटीचा थोडासा तुकडा टाकून आंघोळ करावी. असे केल्याने आर्थिक प्रगतीतील अडथळे दूर होतील आणि धनही प्राप्त होईल. याशिवाय तुरटीयुक्त पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेशी संबंधित आजारांपासून मुक्ती मिळते.
 
ज्या लोकांवर कर्जाचा बोजा जास्त आहे आणि ते वेळेवर उतरू इच्छितात त्यांनी तुरटीमध्ये सिंदूर टाकून त्यावर सुपारी गुंडाळून बुधवारी रक्षासूत्रासह पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. तुरटीच्या या उपायाने तुम्ही लवकरच कर्जाच्या ओझ्यातून मुक्त व्हाल.
 
अस्वीकरण (Disclaimer) : औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेब जगतात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. या संबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.