1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 8 मे 2024 (21:35 IST)

कलयुगी मुलाने पैशासाठी आई आणि दिव्यांग भावाची हत्या केली

murder
पैशाच्या हव्यासापोटी कलियुगीच्या मुलाने आई आणि दिव्यांग भावाची हत्या केली. हे प्रकरण लोणी बॉर्डर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलाब वाटिका कॉलनीतील आहे, जिथे 65 वर्षीय यशोदा देवी आपल्या मुलांसोबत राहत होत्या. यशोदा यांच्या पतीचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले आणि त्यानंतर त्या आपल्या दिव्यांग  मुलगा बिजेंद्र आणि मोठा मुलगा धर्मेंद्र यांच्यासोबत राहत होत्या. धर्मेंद्रला  दारूचे व्यसन जडले होते, त्यामुळे त्याच्यावर खूप कर्ज झाले होते. तीन दिवसांपूर्वी त्याने कर्जाची रक्कम परत करण्यासाठी आई यशोदा यांच्याकडे दीड लाख रुपयांची मागणी केली.
 
आईने पैसे देण्यास नकार दिल्याने यशोदा आणि धर्मेंद्र यांच्यात जोरात भांडण झाले. आपल्या मुलाच्या वाईट सवयींमुळे त्रस्त होऊन त्यांनी धर्मेंद्रला आपल्या मालमत्तेतून हाकलून देण्याचा निर्णय घेतला, धर्मेंद्रला ही गोष्ट समजल्यावर, त्याने आपल्या आईला आणि अपंग भावाला ठार मारण्याचा कट रचला. त्याने खाटेच्या पायाने त्यांच्या डोक्यात सपासप वार करून त्यांना ठार मारले. 
 
घटनेला दरोड्यासारखे भासवण्यासाठी घरातील रोख रक्कम व दागिनेही गायब केले. धर्मेंद्र पत्नी आणि मुलांसह तिसऱ्या मजल्यावर राहतात. दररोज मुलांची आजी आधी उठते, पण आज ती उठली नाही म्हणून मुले आजीच्या खोलीत गेली. खोलीत आजी आणि काकांचे रक्तबंबाळ झालेले मृतदेह पाहून त्यांनी  आरडाओरडा केला.
 
मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून धर्मेंद्र आणि त्यांची पत्नी दुसऱ्या मजल्यावर पोहोचले, तिथे दोन्ही मृतदेह बेडवर पडलेले होते. खोलीतील कपाटातून दागिने आणि पैसे गायब होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले.
 
प्रथमदर्शनी हा खून लुटमारीसाठी चा दिसत असल्याचे पोलिसांना समजले. मात्र घराचे दरवाजे बंद करून मुलगा, सून व त्यांची मुले तिसऱ्या मजल्यावर झोपली होती, त्यांना घरात घडलेली घटना कशी कळली नाही, दरोडेखोर तिसऱ्या मजल्यावर का गेले नाहीत? या प्रश्नांचा तपास करत असताना त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला.
 
यामुळे पोलिसांनी धर्मेंद्रची कसून चौकशी केली यामध्ये त्याने आईने पैसे देण्यास नकार दिल्याचा खुलासा केला. यामुळे त्याला आई आणि भावाला काढून सर्व मालमत्तेचे स्वतः मालक व्हायचे होते. त्यामुळे मंगळवारी रात्री मी गच्चीवर जाऊन दारू पिऊन तिथे पडलेल्या खाटेचा पाय काढून दुसऱ्या मजल्यावर पोहोचलो, तिथे आई व भाऊ झोपले होते. त्यांने खाटेच्या पायाने त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला,

दोघांचाही मृत्यू झाला आणि मी तिसऱ्या मजल्यावर झोपायला गेलो. बुधवारी सकाळी मुलांनी गजर केला आणि सांगितले की, आजी आणि काका रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आई-मुलाच्या हत्येचा पर्दाफाश केला आहे, मुलाच्या या कृत्याबद्दल जो कोणी ऐकला त्याला राग आला की कसले कलियुग आले आहे, त्याला जन्म देणाऱ्या आईची पैशासाठी हत्या करण्यात आली.

Edited by - Priya Dixit