उत्तराखंडमधील धारली येथे भीषण ढगफुटी,खीर गंगा नदीला पूर
Uttarkashi cloud burst : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धारलीजवळ खीर गंगा नदीवर ढग फुटल्याने पूर आला. त्यामुळे तेथे असलेली 20-25 हॉटेल्स आणि होमस्टे वाहून गेल्याचे वृत्त आहे आणि 10-12 लोक बेपत्ता आहेत. धारली हे गंगोत्री धामचे प्रमुख थांबे आहे.
स्थानिक प्रत्यक्षदर्शी राजेश पनवार यांनी सांगितले की, खीर गंगेच्या पाणलोट क्षेत्रात ढग फुटला, ज्यामुळे नदीत विनाशकारी पूर आला. घटनास्थळी जाण्यापूर्वी उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी प्रशांत आर्य यांनी चार जणांच्या मृत्यूची पुष्टी केली.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियावर सांगितले की, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि जिल्हा प्रशासनाचे पथक मदत आणि बचाव कार्यासाठी युद्धपातळीवर कार्यरत आहेत.
त्यांनी सांगितले की ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अपघातामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले.
दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री धाम यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांनी मदत आणि बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
Edited By - Priya Dixit