शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सापाच्या दंशामुळे मृत्यू झाल्यास चार लाख रुपये भरपाई

उत्तर प्रदेशात योगी सरकारने सापाच्या दंशामुळे मृत्यू आपत्ती म्हणून घोषित केली आहे. आता सापाच्या दंशामुळे मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबाला चार लाख रुपये भरपाई देण्यात येईल. मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी बाराबंकी जिल्ह्यातील तराई भागात पूर क्षेत्राचे हवाई सर्वेक्षण केल्यानंतर हा निर्णय घेतला.
 
नेपाळहून वाहणार्‍या नद्यांमुळे बाराबंकीतील जिल्ह्यात घाघरा नदीचा आतंक सुरू आहे. शेकडो गाव पाण्यात बुडाले आहे. शेतकर्‍यांचे पिक नदीत सामावले आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी म्हटले की या आपत्तीमुळे सापाच्या दंशामुळे मृत्यू पडल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. प्रकरणाची गंभीरता बघत सापच्या दंशामुळे झालेल्या मृत्यूला आपत्तीच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.