शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , मंगळवार, 24 नोव्हेंबर 2015 (10:33 IST)

आमिरच्या बायकोला भारतात वाटतेय भीती!

भारतात भीतीचे वातावरण असून आपण देश सोडण्याचा विचार करूया, असे पत्नी किरणने सुचवल्याचे अभिनेता आमिर खानने सांगितल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात तो बोलत होता.
 
देशातील असहिष्णुतेच्या बाबतीत मत व्यक्त करताना या घटनांच्या विरोधात सुरू असलेल्या पुरस्कार वापसीचेही त्याने समर्थन केले.
 
देशातील असुरक्षितता, भय वाढले आहे, असे आमिर म्हणाला. 'आपण भारत सोडूया का असा प्रश्न किरणने धास्तीपोटी मला विचारला होता. तिला मुलांची काळजी वाटते. रोज पेपर उघडतानाही ती घाबरलेली असते. किरणने मला असा प्रश्न विचारणे माज्यासाठी धक्कादायक होते, पण भोवती असलेल्या अस्वस्थतेचे ते द्योतक असल्याचे आमिर म्हणाला.