शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रायबरेली (उत्तर प्रदेश) , शुक्रवार, 29 मे 2015 (10:52 IST)

मोदी सरकारकडून सूडाचे राजकारण : सोनिया गांधी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दोन दिवसांच्या रायबरेलीच्या दौर्‍यावर आहेत. राहुल गांधी यांच्या पाठोपाठ त्यांनीही मोदी सरकारविरोधात तोफ डागली.
 
पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, केंद्रातील मोदी सरकार रायबरेली आणि अमेठी मतदारसंघाला सापत्नभावाची वागणूक देत आहे. सरकारचे कोणतेही प्रकल्प येथे येऊ नयेत, याची काळजी ते घेत आहेत. सोनिया गांधी यांचे आज सकाळी रायबरेलीत आगमन झाले. त्यानंतर त्यांनी विकासकामांबाबत सरकारी अधिकार्‍यांबरोबर चर्चा करून आढावा घेतला. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्री मनोजकुमार पांडे उपस्थित होते. 
 
पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून रायबरेली मतदारसंघात काही रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने पुरेसा निधी न देता कात्री लावली आहे. मोदी सरकार सूडाचे राजकारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.