1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 29 जून 2015 (09:58 IST)

मोदींना रमजान का आठवला नाही?

‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी रक्षाबंधनाबद्दल बोलले हे चांगलेच आहे. पण मग त्यांना ‘रमजान’ का आठवला नाही, त्याबद्दल मोदी काही बोलले का नाही, असा सवाल करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आजाद यांनी मोदींच्या आवाहनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवादित मुद्द्यांना बगल दिल्यानंतर काँग्रेसने मोदींवर हल्लाबोल केला.
 
मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमात रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना ‘जनसुरक्षा’ देण्याचे आवाहन केले. या आवाहननंतर देशभरातून चांगल्या प्रतिक्रिया आल्या. मात्र काँग्रेसने याचे राजकारण सुरू केले असून मोदींवर जोरदार टीका केली आहे.