लव्ह जिहाद: मुस्लिम तरुणांना दूर ठेवण्यासाठी हिंदूंची फौज
लव्ह जिहादच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने विश्व हिंदू परिषदेने नवरात्रीत मुस्लिम तरुणांना गरब्यापासून दूर ठेवण्याच्या हलचाली सुरु केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,हिंदू अस्मिता हितरक्षक समितीने मुस्लिम तरुणांना गरब्यापासून दूर ठेवण्यासाठी जवळपास दीडहजार हिंदू युवकांची फौज तयार केल्याची माहिती समोर आली आहे.या संस्थेची अधिकृतरित्या नोंदणी झाली नसली तरी विश्व हिंदू परिषदेचा पाठिंबा असल्याचे विहिंप नेते आशिष भट्ट यांनी सांगितले आहे.
गरब्याच्या ठिकाणी मुस्लिम युवकांना प्रवेश देऊ नका अशी भूमिका यापूर्वी इंदुर येथील भाजपच्या आमदार उषा ठाकूर यांनी मांडली होती.