शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated :पुणे , बुधवार, 5 फेब्रुवारी 2020 (16:12 IST)

खरे सावरकर समजायला अनेक जन्म घ्यावे लागतील

सावरकर आणि आंबेडकर एकत्र आले असते तर आजचा भारत वेगळा दिसला असता. सावरकरांनी कधीही दुसर्‍या धर्माचा द्वेष केला नाही. त्यामुळे संपूर्ण खरे सावरकर समजायला अनेक जन्म घवे लागतील, असे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटले आहे. पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर वाङ्‌मय वक्तृत्व स्पर्धा समितीच्यावतीने गोखले यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
 
सावरकरांचा विज्ञानवाद लोकांना पटत नाही. गाय हा पशू आहे, असे सावरकरांनी सांगितल्याने स्वतःला हिंदू म्हणवणारा माणूस सावरकर यांच्यापासून दूर जातो ही दुर्दैवाची गोष्ट आहे. स्वतःला स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी, सावरकरभक्त म्हणणे सोपे आहे. पण असे म्हणणार्‍यांनी सावरकरांच्या विचारांवर प्रेम केले पाहिजे, हा माझा आग्रह आहे. देशाला सावरकरांचे विचारच वाचवू शकतात. हिंदू आणि हिंदुत्वाची व्याख्या सावरकरांकडून मिळते. सावरकरांच्या विचारांशिवाय खरा हिंदुत्ववाद मसजणार नाही असे गोखले यांनी सांगितले आहे. 
 
गोखले यांनी यावेळी सावरकरांवर टीका करणार्‍यांना सुना प्रत्येकाकडून काही ना काही चुका होत असतात. सावरकरांकडूनही काही चुका झाल्या असतील तर त्यांचा स्वीकार केला पाहिजे. पण कुणीही उठतो आणि लोकशाहीच्या नावाखाली सावरकरांवर टीका करतो हे फार चुकीचे आहे, असे मत गोखले यांनी व्यक्त केले.
 
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 'हिंदू मॅरेज कोड'चा आग्रह धरला नसता तर हिंदू स्त्रियांचे काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे स्वतःला हिंदू म्हणवून घेणार्‍या स्त्रियांनी रोज डॉ. आंबेडकर यांच्या पायांचे पूजन केले पाहिजे असे गोखले यांनी म्हटले आहे. तसेच धर्मांतर करताना इस्लाम न स्वीकारल्याबद्दल हिंदूंनी कायम डॉ. आंबेडकरांच ऋणात राहिले पाहिजे असेही ते म्हणाले आहेत.