मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 जानेवारी 2018 (15:47 IST)

धक्कादायक खुलासा दारुड्या चालकामुळे कोल्हापूरचा अपघात १३ ठार

कोल्हापूर येथे झालेल्या भीषण अपघात आहे चालकाने  दारू पिल्यामुळे झाला असल्याचे समोर आले आहे.  या अपघातात पुण्यातील बालेवाडी इथं राहणाऱ्या केदारी, वरखडे आणि नांगरे कुटुंबीयांवर काळाने झडप घातली आणि खानदानातील तेरा लोक यात मृत झाले आहे.  पंचगंगा नदीत 100 फुटावरुन मिनी बस कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये 13 जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाबा समोर आली ती म्हणजे चालकाने मद्यपान केल्याचं समोर येतय. दारूच्या नशेत असल्याने त्याचे  त्यामुळे त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, दगडी कठडा तोडून बस थेट नदीत कोसळली आहे. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देणार अशी घोषणा केली आहे.