शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: औरंगाबाद , मंगळवार, 18 सप्टेंबर 2018 (12:36 IST)

मराठवाड्याला मागासलेपणापासून मक्ती हवी

मराठवाड्याला विकासाची भूक आहे आणि मागासलेपणापासून मुक्ती हवी आहे, असे भावनिक वक्तव्य हैदराबाद मु्क्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
राज्य सरकारने मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आतापर्यंत 15 हजार कोटींहून अधिकचा निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातून सर्वाधिक विकास मराठवाड्याचा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याच्या विकासावर आधारित 'अग्रेसर मराठवाडा' या पुस्तिकेचे प्रकाशन केले.