शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नांदेड , मंगळवार, 25 नोव्हेंबर 2014 (11:17 IST)

अन्यथा जनता तुमचाही अजित पवार करेल-उद्धव ठाकरे

महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. मोबाईलचे बिल भरता मग वीजेचे  का नाही? असा सवाल शेतकर्‍यांसमोर उपस्थित करणारे एकनाथ खडसे यांना उद्धव यांनी शेतकर्‍यांच्या मोबाईलला नेटवर्क तरी असते तुमच्या विजेचा आजही पत्ताच नाही, असा टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहे. दुष्काळ परिस्थिती जाणून घेण्यासाठी ते आले आहेत. आज (मंगळवारी) जालना जिल्ह्याचा दौरा करतील. नंतर औरंगाबादकडे रवाना होतील. 
 
उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात सरकार बदलले आहे याची जाणीव शेतकर्‍यांना होऊ द्या. विजेचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी आजही हाल सोसत आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत. आपल्यात आणि अजित पवार यांच्यात फरक आहे याची जाणीव लोकांना होऊ द्या आणि किमान शेतकर्‍यांची खिल्ली उडवू नका. 
 
दरम्यान, अकोल्यातील पत्रकार परिषदेत एकनात खडसे यांनी मोबाईलचे कनेक्शन कट होऊ नये म्हणून हजार रुपयांचे बील भरायला पैसे असतात. मग वीजबील का भरत नाही, असा सवाल उपस्थित करत शेतकर्‍यांकडे पैसे नाहीत हे आपल्याला पटत नसल्याचे वक्तव्य केले केले होते. फारतर वीजबिलात सवलत देऊ, परंतु शेतकर्‍यांना वीजबिल माफ करता येणार नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले आहे.