आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मदतीतही मारला डल्ला
नाशिक: नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटूंबियांसाठी सुरु केलेल्या ‘नाम’ फाउंडेशनचा दाखल देऊन काही भामट्यांकडून या मदतीतही डल्ला मारत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक कुटुंबांना काही भामट्यांनी फोन केले. मदत म्हणून मिळालेल्या १५ हजारांपैकी तीन हजार रुपये अमुक खात्यावर जमा करा.
तसे केल्यास नाना पाटेकर हे स्वत:च्या खात्यातून तुम्हाला पुन्हा एक लाख रुपयांची मदत देणार आहेत, असे या कुटुंबांना सांगण्यात आले. अशा प्रकारे सहा कुटुंबांकडून पैसे उकळण्यात आले आहेत.