जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न द्या
महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
महात्मा फुले हे थोर समाजसुधारक होते. शेतकर्यांसह महिलांना शिक्षण, जातिप्रथा निर्मूलन, विधवांचे सबलीकरण आदी लढय़ांचे ते प्रतीकच बनले होते.