रिक्षा बंद; प्रवासी वेठीस
बेकायदा खासगी टॅक्सी कंपन्यांवर बंदी घालावी, हकीम समिती बरखास्त करू नये, यासह अन्य मागण्यांसाठी आटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनने राज्यव्यापी बंद पुकारला असून रिक्षा बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
रिक्षा चालकांच्या पोटावर पाय आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी हा बंद आहे. चालक ३६५ दिवस प्रवाशांना सेवा देत असतो. त्यामुळे एक दिवसाचा बंद प्रवाशांनी समजून घ्यावा व सहकार्य करावे, असे संघटनेने म्हटले आहे