मुख्य पृष्ठ > मनोरंजन > नाट्य-चित्र > ओळख कलावंताची
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
हंस अकेला - पंडित कुमार गंधर्व
दिलीप चिंचाळकर
कुमार गंधर्वांच्या जयंतीनिमित्त....
kumar gandharv
ND
पंडित कुमार गंधर्व हे शापित गंधर्व होते. ते काही काळासाठी या पृथ्वीतलावर अवतरले आणि आपल्या अद्भुत स्वरांचा पिसारा फुलवून पुन्हा आपल्या देवलोकात निघून गेले.

पंडितजींनी श्रोत्यांच्या मनावर राज्य केले. ते चिंतनशील गायक होते. दार्शनिकही होते. शिवाय कलेचे पारखीही. त्यांचे व्यक्तिमत्व इतके बहुआयामी होते, की त्यांचे सगळे पैलू एका लेखात मावणे अशक्य व्हावे. असे असेल तर मग सेल्युलाईडची फिल्म तरी त्यांना कितपत न्याय देऊ शकेल? पण तरीही पंडितजींच्या व्यक्तिमत्वाला पकडण्याचा प्रयत्न प्रख्यात दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी एका लघुपटाद्वारे केला आहे. या लघुपटाचे नावही अगदी सार्थ आहे. हंस अकेला.

जब्बार पटेल यांना पंडितजींच्या स्वरांची भूल लहानपणीच पडली. त्यांनी अनेकदा पंडितजींना जवळून पाहिले. ऐकले. या शापित गंधर्वाला कॅमेर्‍यात पकडण्याची त्यांची मनस्वी इच्छा होती. अन्यथा हा गंधर्व देवलोकात गेल्यानंतर आपल्या हातात स्वरांचे फक्त ओले स्पर्श रहातील, असे त्यांना वाटत होते. जब्बार यांच्या मनातील इच्छा साकार होण्याची संधी मिळाली १९८५ मध्ये. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी जब्बार यांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेवर एक लघुपट बनवायला सांगितला. त्यावेळी जब्बार यांच्या मनात होते पंडित भीमसेन जोशी, पं. जसराज, किशोरी आमोणकर आणि पंडित कुमार गंधर्व. बाकी तिघांना चितारणे सोपे होते, पण कुमारजींच्या व्यक्तिमत्वाला न्याय देणे कठिण होते. कारण पंडितजींच्या वेगवान गायकीमुळे त्यांचे रेकॉर्डिंग रेडियो स्टेशनवर करणेही कठीण जात असे. शिवाय खुद्द पंडितजींना आपल्यावर चित्रपट वगैरे बनविणे तेवढे काही मान्य नव्हते. पण त्यांचे परमममित्र पु.ल. देशपांडे यांनी आग्रह क रून आणि जब्बार पटेलांनी मनधरणी करून पंडितजींना राजी केले.

कुमारजींची गायकी चित्रित करण्यासाठी खास कार्यक्रम केला. त्याला मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर उपस्थित होते. त्यावेळी मैफलीत कॅमेरा पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले. पंडितजींना जब्बारना विचारले कॅमेरात किती मोठा रोल आहे? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे? जब्बार यांनी सांगितले पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले. 'हंस अकेला' मध्ये ही चीजही पहायला- ऐकायला मिळेल.

(तुम्हाला आवडलेली पंडितजींची गाणी, नाट्यपदे किंवा चीजा खाली लिहा.)
1 | 2  >>  
आणखी
विनोदातील 'दादा'गिरी
उगवती गायिका
श्रावणातलं सुरेल गीत
`परीक्षक चुका सांगतात तेव्हा वाईट वाटते`
जीवनात 'चव' आणते ती 'लावणी'
हंस अकेला - पंडित कुमार गंधर्व