नोकरीतून निवृत्त झाल्यावर दोघांना जरा निवांतपणा आलेला असतो. बाजूला ठेवलेलल्या इच्छा, आवडी-निवडी पुन्हा जोपासाव्या वाटतात. रिकामपण असल्याने खाण्यात सुध्दा चार पदार्थ करावे, खावे असे वाटते.
वयोमानामुळे जिभेवर थोडा लगाम घालावा लागतो. त्यामुळे त्याला योग्य असेच पदार्थ दुपारच्या नाश्त्याला करावे. काही वेळा रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार हे दोस्तही सोबतीला आलेले असतात. ह्या सर्वात योग्य असे कोणते पदार्थ आपण करू शकू ते बघायला हवे.
* दहीपोहे, लाह्या * थालिपीठ * रव्याचा उत्तपा * रव्याचा ढोकळा * तांदुळाच्या पिठाची धिरडी, कटलेट्स * मेदूवडे * दहीवडे * मुगाच्या डाळीची भजी * गाजर हलवा * दुधी हलवा * लाल भोपळ्याचा किंवा रताळ्याचा केक * सुरणाची खीर * बटाटे, मुळा मेथी, कांद्याचे पराठे * तांदुळाच्या रव्याची इडली.
|