दमा हा फुफ्फुसाचा विकार आहे. तो होण्याच्या अनेक कारणात ऍलर्जी हे एक प्रमुख कारण आहे. दमा झालेल्या लोकांना पौष्टिक आहार घ्यावा म्हणजे प्रतिकारकशक्ती वाढते. पण एकावेळी पोटभर जेवू नये. त्यामुळे छातीवर दाब येऊन दम्याचा त्रास वाढायची शक्यता असते. वेळोवेळी थोडे थोडे खावे.
तेलकट, तिखट, आंबट, तळलेले पदार्थ खाऊ नयेत.
दम्यावरील पथ्याचे पदार्थ
* लसूण, कच्चा, फोडणी व चटणी * मध कच्चा कांदा व मध. * मधाचा वाफारा * सोयाबीनचे दूध व मध, * कारल्याचा रस व मध * अमदोरे दही, हिंग, पुदिन्याची चटणी, * द्राक्षे, खजूर, डाळिंब, पिकलेली केळी, अंजीर * गवती चहाचा काढा, बार्ली, लिंबू व मधाचे पाणी, * लाल भोपळ्याचा रस, आवळ्याची पाने व मेथ्यांचा काढा * वाफारा - निलगिरी, लवंग तेल व पेपरमिंटचा.
|