स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या सहा दशकांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करताना दिल्लीतील लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याचा विक्रम भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. त्यांनी तब्बल १७ वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. कणखर व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदिरा गांधी यांनी नेहरूंच्या पाठोपाठ १६ वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. पं. जवाहरलाल नेहरू यांनी देश स्वतंत्र झाल्यावर पहिल्यांदा १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. २७ मे १९६४ पर्यंत ते पंतप्रधान होते. या कालावधीत त्यांनी १७ स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण केले.
देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान....